बारामती आरपीआय (A) मध्ये आमदारकीवरून घमासान


बारामती– आरपीआय आठवले गटामध्ये बारामती तालुक्यात होऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकी वरून जोरदार हालचाली चालु आहेत. सातत्याने तालुका द्वारे व जनसंपर्क चालू असून या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाविरुद्ध उमेदवार देण्याचे निश्चित झाले आहे. या उमेदवारी वरून पक्षांतर्गत रस्सीखेच चालू आहे. शहराध्यक्ष अभिजित कांबळे यांनी मोर्चे बांधणी चालू केली असून यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटांना किंवा इतर पक्षांच्या उमेदवारांना मतदान करायचे नाही अशी आंबेडकरी समाजाचे ठरल्याचे अभिजित कांबळे यांनी सांगितले. तर अभिजित कांबळे यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ राष्ट्रीय नेते मा. रामदासजी आठवले साहेबांना भेटणार असून आठवले साहेबांची वेळ घेतली असल्याचे सांगितले आहे.

Advertisemen

बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेडकरी समाजाचे मतदान हे निर्णायक असून हा मतदारसंघ यापूर्वी अनुसूचित जातीसाठी राखीव होता. बुद्धवासी लोंढे यांनी नेतृत्व केले असून या मतदारसंघात त्यांनी सहकाराचे जाळे पसरवले आहे. अनुसूचित जातींचा माणूस या मतदारसंघात नेतृत्व करू शकतो हे सिद्ध झाले आहे. असे असताना ही आंबेडकरी समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व दिले जात नाही. चमच्याना व दलालांना हाताला धरून येथील अनुसूचित जाती जमातीचे विकास वंचित केले आहे. असे असल्यामुळे यावेळेस सर्व ताकदीनिशी आरपीआय आठवले गटाने मा. अभिजित कांबळे यांनी सर्वांमते ही निवडणूक लढविल्यास असे ठरवले असताना राष्ट्रवादीची काही नेते काही नेते आरपीआय मध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र करत आहे. बारामती तालुक्यामध्ये आंबेडकरी समाजाला कधीही सामाजिक राजकिय आर्थिक बळ आजपर्यंत दिले गेले नाही या कारणास्तव आंबेडकरी समाजाची ताकद व आरपीआय ची ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. असे अभिजित कांबळे यांनी सांगितले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »